Wednesday, October 2, 2019

सत्य आणि अहिंसेची आज जगाला गरज





या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत.”
                                       - महात्मा गांधी

     मला कमाल वाटते बापूंजींची कारण एवढं सारं जगाला देवूनही ते म्हणतात सत्य आणि अहिंसा या जुन्या गोष्टी आहेत. मान्य आहे कि सत्य आणि अहिंसा ही खूप जुनी तत्व आहेत म्हणजे गौतम बुध्दांनी ही हिच शिकवण दिली. पण बुध्दां नंतर जगाला सत्य आणि अहिंसा कुणी शिकवली असेल तर ती माहत्मा गांधी यांनी. हे सांगण्याच कारण म्हणजे मी २००९ साली माहात्मा गांधी यांच साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेलं सत्याचे प्रयोग (आत्मकथा) हे पुस्तक वाचलं होतं. त्यावेळी पुस्तक खूप आवडलं होतं. पण आज ज्यावेळी मी विचार करतो कि पुस्तकातील काय आवडलं होतं तर ते म्हणजे “गांधीजींचा प्रमाणिकपणा जो त्यांच्या जगण्यातून जाणवतो. पुस्तकातील प्रत्येक प्रसंगात गांधी आजूबाजूच्या भवतालाबद्द्ल आणि स्वता:च्या आतील भवताल यांच्यात होणा-या संघर्षाबाबत बोलतात. तो संघर्ष झाला नसता तर कदाचित गांधी सत्य आणि अहिंसे पर्यंत पोहचले नसते. त्या संघर्षातूनच त्यांना बाहेरील जगात जगण्यासाठीच्या संघर्षाची शस्त्रे मिळाली आणि ती म्हणजे सत्य आणि अहिंसा. हे जगासमोर मांडताना त्यांनी स्वता:चा विचार तसा बनवला म्हणून आचार तसाच झाला आणि आचार तसा झाल म्हणून प्रचार आपोआप तसाच झाला. जो जगातील त्या कालखंडातील माणसांच्या ह्रदयात कोरला गेला. आजही तो काही प्रमाणात काहीच लोकांच्या मनात शिल्ल्क आहे.
     सत्यग्रही मार्गाने लढण्याची ताकत त्या कालखंडात गांधींनी बाळगली म्हणूनच आज जग शांततेच्या मार्गाने चालत आहे. अन्यथा १९१५ पासून सातत्याने जगात युध्दजन्य परिस्थिती होती. पहिलं महायुध्द, दुसर महायुध्द, याच्यात प्रत्येक राष्ट्रातील नेता हिंसेवर विश्वास ठेवून लढाई लढत होता. म्हणजे १९४२ ते १९५२ या दशकात तर प्रचंड मोठ्या प्रमाणात युध्दाने मानवी आणि साधनसंपत्तीची हानी झाली आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, रशिया आणि इतर अनेक देशांच्या नेत्यांना वाटत होत की दुस-यांचा परावभ केला कि आपण सुरक्षित राहू आणि आपण जगावर राज्य करू. पण त्यांच्या हे लक्षात आलं नाही की कोणतीच राज्य ज्यांनी हिसा केली ती कायमस्वरूपी टिकली नाहीत. जगाला जर टिकून राहायच असेल तर प्रेम, अहिंसा आणि सत्याच्या मार्गावरच चालल पाहिजे हे माहात्मा गांधीने ओळखलं. मग गांधीने सत्याग्राच्या मार्गाने लढाई उभा केली. गांधी कोणालच शत्रू मानत नव्हते. त्यांना वाटायचं की जगात जन्मालेल्या प्रत्येकांने प्रेमाने, सत्याने आणि अहिंसेन चाललं तर ईश्वराला (निर्गाला) अभिप्रेत असणारा मानवी समूह तयार होईल.    
माहात्मा गांधी जयंतीच्या आपणास शुभेच्छा!

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts