Monday, November 11, 2019

ताडोबा अभयारण्याला “ताडोबा” का म्हणतात?



ताडोबा अभयारण्याला “ताडोबा” का म्हणतात?

डोक्यात खूप वर्षांपासून घोळत असलेल्या प्रश्नाच उत्तर चंद्रपूरला ताडोबा अभयारण्यात गेल्यावर मिळाल. प्रश्न तसा साधाच आहे. ताडोबाला ताडोबा का म्हणतात? याच्या अगोदर खूप लोकांना विचारलं होतं आणि तिथही बाहेर असणा-यानां विचारलं होत पण उत्तर मनाला पटेल असं काही मिळालं नाही. मग आम्ही ज्यावेळी अभयारण्यात फिरत होतो. त्यावेळी आमच्या सोबत असणा-या गाईडला विचारलं तर त्यांन सांगितलं की “ताडोबा हा शब्द ब्रिटिंशांच्या उच्चारातून तयार झाला. म्हणजे त्या जंगलात खूप वर्षांपुर्वी अदिवासी राहायचे. त्या अदिवासीपैकी सुरवातीच्या टोळ्यात तारू नावाचा अदिवासी नेतृत्व करत होता. त्याने अनेक निष्पाप अदिवासींचे जंगली प्राण्यांपासून प्राण वाचवले होते. तो कोणत्याही जंगली प्राण्यापासून टोळीच संरक्षण करायचा. विशेष करून वाघापासून तर अनेक जणांना त्याने वाचवलं होतं. पण एकदा तारूवरच वाघाचा हल्ला झाला. आणि वाघाबरोबर झुंझत असताना तो जखमी झाला. आणि त्या हल्यात तारूचा मुत्यु झाला. अदिवासी समाजात आजही एक प्रथा आहे. जर वाघाच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचं स्मारक (समाधी) जंगलात उभा केलं जात आणि नंतर त्या ठिकाणी वर्षाला स्मरण केलं जातं. त्यावेळी तारु हा पालक होता त्यामुळे त्याच्या नावापुढे “बा” हा शब्द जोडण्यात आला. बा म्हणजे मोठा.  मग तारू+बा= तारुबा असा शब्द तयार झाला. आजही  या तारूबाचं छोटसं स्मारक आहे. आज त्याला तिथे मंदिराच स्वरूप दिलं आहे. तिथं दरवर्षी प्रथेप्रमाणे अदिवासींची यात्रा होते. त्यामुळं या जंगलाला तारूबा जंगल असं म्हंटल जायचं.  
    पुढं सतराव्या शतकात ब्रिटीशांनी या जंगलाचा ताबा मिळवला. ब्रिटिंशांना तारूबा हा शब्द उच्चराता येत नव्हता. त्यांनी ताडूबा असं उच्चार केला. पुढं इंग्रजीत तो “TADOBA”  लिहला गेला. पुढं ब्रिटिंशांच्याच कागदपत्रावरून मराठीत हा शब्दा आहे तसा घेताला. आज ताडोबा हा शब्द सर्वांन कडून सर्रास वापरला जाऊ लागला. त्यालाच आपण ताडोबा अभयारण्य असे म्हणतो.  
धन्यवाद मंगेश सर या अत्यंत महत्वाच्या माहिती बद्दल.
धन्यवाद राजाभाऊ आणि उषाताई... आपण खूप व्यस्त वेळातून ताडोबा चा फेरफटका घडवला.


No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts