संध्याकाळची
पाचची वेळ होती. ऑफिस मधून सुटायला मनिषला अजून एक तास बाकी होता. पण मनिषच्या
बायकोच्या त्याला सारखे फोन येत होते. आलेला फोन तो कधी उचलायचा तर कधी मेसेज
करायचा की थोड्यावेळात फोन करतो. नेमकं त्यावेळीच त्याला काम लागलं. मनिष बॅक ऑफिस
मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करायचा त्यामुळे त्याला अनेक गोष्टींकडं लक्ष द्याव
लागायचं. म्हणून तो बायकोचा फोन टाळायचा. ऑफिस सुटण्याची वेळ झाली त्यावेळी
बायकोला फोन केला.
“हॅलो, हं बोल
किती मिस्ड कॉल्स दिलेस?”
ती म्हणते, “मिस्ड
कॉल्स नाही, आठ वेळा फोन केलता, तू उचलला नाहीस.”
तो म्हणतो, “ अग राणी कामात होतो, म्हणलं फ्री
झालं की तुला कॉल करावा”.
ती, डू यू
रिमेम्बर?, आज माझा वाढदिवस आहे ते?”
तो हाताला फोन
मानेने धरत आणि टेबलावरची फाईल ड्रावर मध्ये ठेवत,“यस राणी, अग तुला ना सरप्राईज
द्यायच होतं, तू ना मध्येच गोंधळ केलास”.
ती हसत हसत म्हणते,
“सांग, कितीवेळ मी माझ्या राजाची वाट बघू?”
तो, “अग, सितार
असेल ना तिथे”
ती, नाहीरे...
उगीच लाजतोस मुलांना..” तो, “बरं ऎक ना, तू गेटवेला पोहच, मी तिकडे येतोच ऑफिस
मधून”
ती, “वाट पाहायाल
लावू नकोस, अं.. आय विल रिच देअर इन हाफ आवर, ओके.. बाय..डिअर.. लव्ह यू” तो, “यस..
लव्ह यू टू.. चल.. बाय..”.
मनिष फोन ठेवतो,
टेबलावरची आवरा आवरी करतो आणि निघण्याची तयारी करतो तेवढ्यात त्याच्या समोर पाच
साहा ऑफिसमधील कर्मचारी येतात. त्यातील एकजण म्हणतो, “सर आपल्याला दुसरीकडे नौकरी
शोधावी लागेल”, मनिष त्यांच्याकडे बघत, “ तुम्ही माझी चेष्टा करताय का? मला जायचय,
उशीर होतोय, ती वाट बघत असेल तिकडे” . त्यातील दुसरा म्हणतो, “ सर घोटाळा झालाय,
आपली कंपनी बंद पडतेय, आपण दिवाळ खोरीत निघालोत”. मनिष, “ तुम्ही वेडे आहात का
सारे जण.. गेल्या २३ वर्षापासून मी इथ नौकरी करतोय, आसं कधीच घडलं नाही, आणि जेट
सोबत तर कधीच घडणार नाही, तुम्ही मला जाऊ द्या.. नाहीतर बायको मला सोडणार नाही.”
त्यांच्यापैकी एकजण मोठ्याने ओरडून, “ सर आहो, आपण जॉबलेस झालोत, खरं बोलतायत
सारे, तिकडे बघा, इनहाऊस मध्ये गर्दि जमलेय.. बाहेर ही सार जमलेत.. चला तिकडे जाऊन
बघू”. हे ऎकून मनिष साहेबांचा विश्वास बसाया लागला. हातातील बॅग खांद्यावर अडकवत
बाहेर येतात तर समोर दोनशे लोक जमलेली दिसली. प्रत्येकाचा चेहरा पडलेला होता.
प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य “हे असं कसं घडलं?” आता पुढ करायच काय? हे बघून तर
मनिष साहेब जाग्यावरच बसले. बायकोचे फोनवर फोन येत होते. तिकडे बायको नटून थटून
आली होती, पार्टीला जाण्याच्या तयारीने आली होती. पण मनिष काय फोन उचलत नव्हता.
मनिषचं आवसन गळून पडलं होतं. त्याला दिसत होते घेतलेल्या घराचे हप्ते, मुलांची
शिक्षणाची फी, म्हाता-या आई-वडिलांच आजारपण. हे सारं डोळ्यासमोर तरळत होतं. महिन्याच्या
महिन्याला येणा-या पगारावर सारं चालायच पण जर कंपनीच बंद पडली तर काय होईल? आता या
वयात दुसरीकडे साठ हजार पगारावर नौकरी मिळेल का? हा विचार करत मनिष पोर्च मध्येच बसला. सुन्न
होऊन जमलेल्या गर्दीकडे बघत होता. त्याला कळतंही नव्हत की फोन वाजतोय. दोन तास
त्या जाग्यावरच बसून होता. बायको चिडून काय झालय, पती येणार होता पण का आला नाही..
म्हणून तिच ऑफिस कडे येते तर समोर हजारो कर्मचारी जमलेले दिसतात. ती त्या गर्दी
मध्ये मनिषला शोधते. शोधत शोधत पोर्च मध्ये येते तिथे मनिष आडवा झोपलेला दिसला. ती
पळत जाते त्याला उठवते, तो काहिच बोलत नाही. ती त्याला धिर देते. बाकीचेही
कर्मचारी त्याला बोलण्याचा प्रयत्न करतात पण मनिष काहीच बोलत नाही. असे मनिष सारखे सोहळा हजार कर्मचारी बेरोजगार
झालेत. त्यांची घरं रस्त्यावर आली आहेत. का घडलं हे सार? कोणामुळं घडल हे असं?
याच्यात कर्मचा-यांचा काय दोष? त्यातील काहीजण नैराश्यग्रस्त झालेत. कसं सावरणार
हे सारं?

हे विदारक सत्य फक्त जेट एअर वेज सारख्या कंपनीचं फक्त नाही, तर अशा अनेक कंपन्या किंवा त्यांचे मालक स्वतःच्या फायद्यासाठी अनेकांवर बेरोजगारीची कुर्हाड ठेवतात.
ReplyDeleteबरोबर आहे। हे जेट एअर प्रतिनिधी क आहे
Delete