Showing posts with label कृषी विभाग महाराष्ट्र शासन. Show all posts
Showing posts with label कृषी विभाग महाराष्ट्र शासन. Show all posts

Saturday, June 6, 2020

लॉकडाऊनच्या नावाखाली शासनाच्या कृषी सेवा केंद्रात खते व बी-बीयाणे विक्रीवरुन मनमानी




       शासनाच्या कृषी खात्याकडून शेतक-यांना बी-बीयाणे व खते बांधावर पोहचवणार असे जाहिर केले होते. पण सध्याची परिस्थिती पहाता शेतक-यांना कृषी सेवा केंद्राकडूनच बी-बीयाणे व खते उपलब्ध होत नाहीत. शॆतकरी कृषी सेवा केंद्रात ये-जा करत आहेत पण कृषी सेवा केंद्राकडून सांगण्यात येत आहे की, “अजून खते आली नाहीत. बीयाणे आलेली संपली आहेत.” असं सांगून अडलेल्या शेतक-यांना परत पाठवलं जात. स्टॉक शिल्लक ठेवून, माल नाही असं जाहिर करून, ऎनवेळी माल बाहेर काढायचा त्यामुळे तरसलेले शेतकरी गर्दी करतात कारण पेरणीचे दिवस संपत आलेले असतात त्यांच्यापुढे बी-बीयाणे व खते मिळेल त्या किमतीत घेण्याशीवाय पर्याय राहत नाही. आणि जे जास्त पैसे देवू शकतील किंवा बीयाणा सोबत खतही घेतील त्यांनाच बी-बीयाणे व खते विकली जातात. खतं व बीयाणे वाढीव किंमतीत घेण्याची जबरदस्ती कृषीसेवा केंद्राकडून करण्यात येत आहे. याच्यात अल्पभूधारक शॆतक-यांची लूट होत आहे. त्यांच आर्थिक शोषण केलं जात आहे. एक तर या वर्षी करोनाच्या साथीत गरिब अल्पभूधारक शॆतकरी मेटाकुटीला आला आहे. काही शॆतक-यांची पीक अवकाळी पावसामुळे वाया गेली. काहींना भाव मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतक-यांना शासनाच्या कृषी सेवा केंद्राकडूनच अडचणीत पकडल जात आहे.

     मान्सूनचा पाऊस येण्या अगोदरच अवकाळी पाऊस मुसळधार झाला. त्यामुळे सोलापूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातील काही तालुक्यात पेरण्या करण्यासाठी शॆतक-यांनी तिफ़णी उचललेल्या आहेत. पण बी-बीयाणे व खते मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्राकडे फ़े-या माराव्या लागत आहेत. त्या फ़े-या मारण्यातच शेतक-यांची ऊर्जा खर्ची होत आहे.

    कृषी विज्ञान केंद्राच्या अधिका-यांकडून सांगण्यात आलं आहे की,“नियमानुसार कोणतही बी विकताना लिंकेज करता येत नाही. कृषी सेवा केंद्राकडे किती स्टॉक आहे व त्याच्या किंमती काय आहेत. याची माहिती बाहेर बोर्डावर प्रदर्शित करण बंधनकारक आहे. प्रत्येक शेतक-यांना शासनाच्या दरपत्रकानुसार बी-बीयाणे मिळाली पाहिजेत.”

     शासनाची नियमावली कृषी विज्ञान केंद्र चालवणा-यांनी धाब्यावर बसवली आहे. हे असंच जर सुरू राहिलं तर कित्येक अल्पभूधारक शॆतकरी पेरणी वाचून वंचित राहतील. या वर्षी करोना महामारीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गरिब, कष्टकरी, अल्पभूधारक शॆतक-यांना खरं तर मदतीची गरज आहे. जर त्यांची पेरणी वेळेत झाली नाही तर या शॆतक-यांच पीक येणार नाही. परिणामी ते अजून जास्तच हालाखीच्या परिस्थितीत ढकलेले जातील. याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल.  आत्ताच सावध पवित्रा घेऊन, प्रत्येक शॆतक-यांना बी-बीयाणे मिळतील याची दक्षता घॆण गरजेच आहे.  


टिप: बार्शी, कळंब व केज तालुक्यातील शेतक-यांनी सांगितलेल्या माहितीवरून.     

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts