गेल्या १०-१५ वर्षापासून शहरात रोजगारासाठी स्थलांतरित झालेले असंख्य मजूर व कामगार आहेत. शहरात कुठेही राहून म्हणजे मिळेल त्या जागेवर झोपडी करून, हाताला मिळेल ते काम करणारा एक मोठा वर्ग आहे. तो शहरात हळू हळू स्थिर स्थावर होत आहे. पण अचानाक आलेल्या कोव्हीड-१९ च्या साथीमुळे उच्चभ्रू, मध्यम वर्गीय यांच्या सोबत कष्टकरी व गरीब लोकांचे आयुष्यही ढवळून निघाले.
जांच्याकडे काही बचत करून ठेवलेली रक्कम होती त्यांच आयुष्य सुरूळीत आहे. पण हातावरच्या कामाने पोट भरणा-या जनतेच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांची शहरातील जगण्याची साधन बंद झाली. सर्व काम ठप्प झाली म्हणून ते गावाकडे आले.
यातील कित्येक लोक चालत, सायकल, व मोटार सायकल किंवा ट्रक मध्ये आले होते. गावाकडे आल्यानंतर एकतर सुरवातीला गावात घेत नव्हते. शासनाच्या आदेशानुसार गावात घेऊन शाळेत किंवा घरात क्वारंटाईन करायला सांगितले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर ते त्यांच्या घरात राहण्यासाठी गेले. त्यांची गावात शेती नसल्यामुळे व घर ही जुनाट पडलेलं असल्यामुळे गावात राहण्याची अडचण निर्माण झाली. पण तरीही त्यांनी काहीतरी करून राहण्याची सोय केली. तसही गावाकडे कितीही आर्थिक अडचण असली तरी माणूस उपाशी मरत नाही. पण करोना हा साथीचा आजार असल्यामुळे गावातील माणसं एकमेकांना भेटण व जवळ जाण टाळू लागली. पाण्यासाठी सामूहिक नळावर बंदी घातली. मग बाहेरून आलेल्या लोकांनी विहीरी, नद्या व बारवाहून पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

No comments:
Post a Comment