Friday, May 10, 2019

आत्मिक प्रेम







नरेश हा १२ वर्षाचा मुलगा इयत्ता सहावीत महानगरपालिकेच्या शाळेत शिकत आहे. तो शाळेत आठवड्यातून दोन ते तीन वेळा उशीरा जायचा. उशीरा गेला की मॅडम त्याला वर्गात उभा करायच्या. त्यामुळे तो ज्या दिवशी उशीर जायचा त्या दिवशी बाहरे मोकळ्या मैदानात झाडाखाली बसायचा. आणि साफसफाई करना-या मावश्या कसं काम करत्यात ते बघत बसायचा. बेलं झाली की दुस-या तासाला जाऊन बसायचा.  त्याला विचारलं तर तो म्हणायचा, “आईला कामात मदत करावी लागते. आठवड्यातून तीन दिवस मी मदत करतो तर तीन दिवस ताई करते. ज्या दिवशी ताई आईला मदत करते त्या दिवशी मी वेळेत येतो.” त्याला पुढं विचारलं की तुझी आई काय काम करते? तो म्हणायचा, “बाबा वारल्यापासून दुस-याच्या घरातील भांडी धुणं, आंगण स्वच्छ करणं, बागकाम करणं असली कामं करते”. आई आमच्या शॆजारच्या कॉलनीतील तीन घरी काम करते. घरातलं काम करून त्यांच्या घरी लवकर जावं लागतय. आईला खूप काम असतयं म्हणून मी व ताई मदत करतो.”  
     त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर नरेशनं आईच्या हाताला फडक बांधलेल बघितलं. त्यांन आईला विचारलं, “आय हाताला का बांधलय?” आई त्याच्याकडं बघत, “काय नाय रं, कचार उचलताना हातात काच घुसला, म्हण हे फडक बांधलय. तुझं कशालारं तिकडं ध्यान, गपगुमान अभ्यास कर की”. असं म्हणून आई तिच्या कामला लागली. पण त्या दिवसापासून नरेशच्या मनात घोंघावत व्हत की आई साठी काय तरी कराया पाहिजे. एकतर भरपूर आभ्यास करून चांगली नौकरी मिळवण आणि आईला या कामातून मुक्त करणं.
     दुस-या दिवशी नरेश आईला कामात मदत करून नेमकं शाळेत उशीरा पोहचला. आणि नेहमी सारखा मैदानात बसला. त्या दिवशी त्याचं लक्ष त्या साफसफाई करणा-या मावशीकडे गेलं. त्यांच्या हातातील पांढरा ग्लोज घातलेला पाहून तो पळत त्या मावशीकडं गेला आणि विचारलं, “मावशी, ते हातातलं काय हाय?” मावशीनं त्याच्यकडं बघत, “काय म्हणतोस रं पोरा?” नरेश आजून जवळ जात, “आवं ते हातात घातल्याल?” हात वर करून मावशी दाखवाया लागली, “ हे व्हय, ह्याला गोलकोज म्हणतात.” नरनेश उत्सुकतेने विचारतो, “ कुठ मिळत्यात?” मावशी तीच काम करतं, “ तुला काय करायचयं रं पोरा, साळांत जाऊन बसकी, उगचं का हुंदडत फिरतोय?” नरेश मावशीला विनवण्या करीत , “ह्यो गोलकोज घातला की हाताला काय लागत नाय ना? आन मावशी, सांगा ना कुठं मिळतयं?” मावशी ह्याचा प्रश्न ऎकून चिडून जाते, “ आरंय पोरा, मास्तरनीलाच सांगलं बघ, जा वर्गात बस”. नरशे थोडसं लांब जात, “ मावशी तुमच्या पाया पडतो, सांगा की कुठ मिळतयं ते?” मावशी हात करून त्याला म्होरलं दुकान दाखवते. तो तसाच दुकानात जातो. दुकानदाराला जाऊन विचारतो. दुकानदार सांगतो ५० रुपायाला दोन ग्लोज मिळतात. हे ऎकून तो तसाच घरी जातो आणि त्याच्या गल्यात किती पैसं हायती हे बघतो त्यात तीस रूपये असतात. मग तो घरीहून आईनं खायाला ५ रूपये दिलं की तसचं ठेवतो. पुढच्या पाच दिवसात तो वीस रूपये जमा करतो. आणि ठरवतो की उद्या ग्लोज आणायचे. नेमंक त्या दिवशी ठेवलेल्या गल्यातील पैसे बघतो तर तीसचं रुपये असतात. तो विचार करतो की पन्नास रूपये झाले होते मग गेलं कुठं? तो रागारागात ताईला विचारतो, “ताई, तू गल्यातलं पैस घेतलस का?” ताई त्याच्याकडे येत, “मला काय माहित तुझा गल्ला, कुठाय तो?” नरेश रडत रडत, “ताई सांग ना, आग आय ला गोलकोज आणायच म्हणून ठेवल्यालं.. तू घेतल्सं का ? खरं सांग ना?  हे ऎकल्यावर ताई कबूल करते की वीस रुपये घेतलं व्हतं पावडारचा डबा आणायला.  मग दोघही मिळून चार दिवसात परत राहिलेलं पैसं जमवतात. आणि दुकानात जाऊन ग्लोज घेऊन येतात. संध्याकाळी आई घरी आली की नरेश म्हणतो,
“ आय, तुझ्या हाताला लागलेलं बरं झालं का?”
आई त्याच्याकडं हसत, “कारं, त्वा काय डाकटर कडं नेहचील काय मला”.
“ व्ह्य. पण बरं झालं असलं तर नाय.”
“मग कशाला इचारतोस”
नरेश बॅग मधील ग्लोज काढतं, “आय्य आग पुढच्या वेळंस तुझ्या हाताला काय बी लागणार नाय, तू डोळं बंद कर.”
      आई मात्र नग नग म्हणत डोळं बंद करते आणि नरेश हॅन्ड ग्लोज आईच्या हातावर ठेवतो. आणि नरेश मोठ्यान म्हणतो, “आय डोळं उघड”. आई डोळं उघडते आणि बघते तर हातात ग्लोज असतात. नरेश सांगतो, “आय त्वा हातात घालून काम करायचं. म्हंजी हाताला काय बी लागणार नाय”. हे सांगताना आई नरेशकडं भारावून बघते आणि त्याचं बोलनं ऎकून तिच्या काळजाला पाझर फुटतो. ती त्याला जवळ ओढते आणि छातीशी धरत म्हणते, “माझ्या सोन्याला कुठून एवढं शाहणपण आलयं, माझ्या राज्याचा माझ्यवर किती जीव हायरं” आणि पटापटा मुकं घेतं रडायला लागते. ताई म्हणते, “आय म्या नाय काग तुला कामात मदत करतं?” आई  भावनिक होऊन तिलाही मिठीत ओढेते “व्ह्य ग माय त्वा बी लय करतेस, सोन्या सारखी लेकरं माझी.” असं म्हणून वर भिंतीकडं बघून डोळं पुसतं तिघही एकमेकांच्या कुशीत विसवतात. नरेश आईच्या पदराला बिलगून राहतो.    

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts