(नौकरी करता करता
बनला उद्योजक आणि बेकार युवकांना दिली नौकरी)
अंगावरच्या कपड्यानुसार गाव सोडलं. पुण्यात
आला. शिक्षणाची पदवी सोबत होती. मग सुरू झालं या दारावरून त्या दारावर नौकरी मागण.
पण कोणी नौकरी देत नव्हत. बीसीए ची पदवी असूनही म्हणावी तशी नौकरी मिळाली नाही. मग
फायनान्स मध्ये एका कंपनीत काम मिळालं. मिळालेल्या संधीच सोन करायचं म्हणून पडेल
ते काम करायला सुरू केली. गावाकडचा गडी असल्यामुळे शारीरीक कंटाळा कधीच नव्हता.
मानसिक थोडाफार त्रास व्ह्यायचा पण हार मानली नाही. कामाचा दर्जा सुधारला, नविन
गोष्टी शिकून घेतल्या त्यामुळे कंपनीत सर्वजण कौतुक करयला लगले त्यातुनच पुढे पगार
वाढ झाली. कंपनीतल्या वरिष्ठ अधिका-यांनी कामाचं कौतुक केलं. त्यामुळे या गड्याचा
आत्मविश्वास खूप वाढला. काही दिवसांतच स्वता:च स्थान निर्माण केलं. पण सतत वाटू
लागलं की आपण काम करतोय पण आपल्या मनाला त्या कामातून समाधान मिळतं नाही. आपण
स्वता:चा व्यवसाय सुरु करावा. आसं मनातल्या मनात वाटत होतं. पण लगेच धाडस करता येत
नव्हत. घरी चर्चा केली पण मार्ग निघत नव्हता. तसचं काही दिवस काम करत राहिले. आता
मात्र पगार वाढून लाखरूपाया पर्यंत पोहचला होता. त्यामुळे घरच्याना वाटत होतं की
नौकरी सोडू नये कारण सर्व काही व्यवस्थित झालं आहे.
पण त्यांचं मन त्यांना काय स्वत बसू देत
नव्हत. मग ठरवलं इव्हेंट कंपनी सुरू करायची आणि एका राहात्या खॊलीत दोघांना बरोबर
घॆऊन टोटल इव्हेंट कंपनीची स्थापना २०१४ मध्ये केली. आज कंपनीचा करोडो रुपायात टर्नओव्हर
आहे आणि १०० पेक्षा जास्त युवकांच्या हाताला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष काम मिळवून दिलयं
ते गणेश वाघमारे यांनी. आज ते टोटल इव्हेंट कंपनी च्या माध्यमातून बॅंकीग,
फायनान्स, आयटी, एज्युकेशन व अनेक कॉर्पोरेट कंपनीच इव्हेटं मॅनेजमेन्टंच काम
करतात. शिवाय आपल्याकडे लग्नाचं व्यवस्थापन करूनही करोडपती होता येत हेच गणेश
वाघमारेनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटलं की
हे पाच वर्षात कसं शक्य झालं. तर ते म्हणतात, “कोणतीही आर्थिक मदत नव्हती, उद्योग
सुरु केला त्यावेळी स्वत:हा जवळ सेव्हीग्जं केलेले थोडेफार पैसे होते. त्याच्याच
जिवावर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि आज
ह्या व्यवसायात पाय रोवला आहे”.
कोणत्याही प्रकारचा कोणाचाही आधार नसताना
एखाद्या उद्योगात उतरून आणि तो यशस्वी करून दाखवण खूप कठीण काम आहे. पण गणेश
वाघमारेंनी हे आत्मविश्वास, चिकाटी, संवाद कौशल्य, व्यावाहारिक चातुर्य, सातत्य व
सहकार्याची भावना याच्या जोरावर हे सिध्द करून दाखलं की तुम्ही कोणताही व्यवसाय
निवडून स्वता:च्या हिमत्तीवर यशस्वी करु शकता. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली
आहे. त्याला उत्तर म्हणजे तरुणांनी आपापल्या परीने रोजगार निर्माण करावा व बेकार
तरूणांना रोजगार द्यावा. तरच बेरोजगारी कमी होईल.
यासंर्दभात गणेश वाघमारे म्हणतात की, “युवकांनी
या व्यवसायात उतरावे, अडचणीच्या वेळी आम्ही मदत निश्चित करू. सुरवातील वेन्डर
म्हणूनही आमच्यासोबत काम करता येईल, त्याच्यासाठी मार्गदर्शन करू”. “या व्यवसायात
स्टेज व्यवस्थापनापासून ते सेलिब्रिटी मॅनेज करण्यापर्यंतच काम असतं. साध्या
जेवणापासून ते पंचतारकंती पंचपक्कान्न पर्यंत सेवा पुरवाव्या लागतात. छोटा मंडप ते
भव्यदिव्य पेन्डॉल उभा करण्यासाठी खूप काम असतं. मनोरंजनाचे विविध कार्यक्रम,
सांस्कृतिक, राजकिय, कॉर्पोरेट आणि इतरही अनेक प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेन्ट
करण्यासाठी येत्या काळात खूप मोठी संधी आहे. हे काम करण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक
आहे. ज्यांच्याकड कौशल्य आहे ते खूप चांगल्यापध्दतीने काम करून अर्थार्जन करू
शकतात.” असं वाघमारेनी सांगितलं. ज्यांना इंव्हेटं व्यवस्थापनाची आवड आहे त्यांनी
त्यांच्या आवडीचं रुपांतर व्यवसायात करून नविन वाट निर्माण करण्यास तयार व्हावे.
ज्ञानेश्वर जाधवर
(यसन कादंबरीचे लेखक-९६५७९८५९३५)

No comments:
Post a Comment