(सांगली कोल्हापुराला
महापुरानं कवेत घेतलं, होत्याच नव्हतं झालं, महापुरासोबत आश्रूंचा पुर वाहू लागला,
आश्रू पुसण्यासाठी सारां महाराष्ट्र पुढं आला.. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र आणि
विदर्भातील हा भावनिक संवाद...)
पश्चिम माहाराष्ट्र: आता काय खरं नायSSS रांडच्या,
पंचगंगेच पाणी वरचेवर वाढतच चाललय.. तिकडं कृष्णा नदीन बी पाय पसारलाय, काय तरी
करायला पाहिजे मर्दा..
विदर्भ: अ बेSSS थोडा धिर धर ..
प.मा: ये मर्दा, आरं आत्ता मातर पाणी नाकातोंडात चाललय आमच्या..
जगू की मरू? सांगता येत नाय?
विदर्भ: काळजी नकू करू बे, काय व्हत नाय..
(बोलणं सुरू असतानाच
पुरांच पाणी वाढत आणि महापुर येतो. सारी गावं, सांगली, कोल्हापूर पाण्यात जातं)
प.मा : काय कसं व्हत नाय मर्दा, आयुष्यभर जपलेलं सारं वाहून
गेलं पाण्यात.. (आणि पाणी रडायला लागंत)
विदर्भ: अ बे, रडु नकू, म्या हाय तुझ्या सोबत.. (असं म्हणुन
विदर्भ पश्चिम माहाराष्ट्राच्या आश्रू पुसाया लागतो)
प. मा: आरं मर्दा, तू हाईस तरी कोण?
विदर्भ: अ बेsss म्या “माणूस” हाय. आन त्वा बी माणुसच हाईस..
माणसांन माणसाला मदत करायची नाय तर कोण करणार.. गप्पं आता, पुसं बरं ते डोळं..
मर्दा सारख पुन्हा उभा राहयच.. ( आन दोघं एकमेकांना बघून गहिवरतात)
(टिप: विदर्भातील
महेश पवार हे स्वमिनी संघटनेच्या माध्यमातून हजारो दारूच्या आहारी गेलेल्या
कुटंबाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. घरात काही नसणं आणि घरच वाहून जाण यामुळे
होणारं दु:ख प्रचंड असतं. हे जाणून महेश पवार आणि त्यांच्या संघटनेने
पुरग्रस्तानां ट्रकभर अन्नधान्य, कपडे, खेळणी आणि इतर घरगुती उपयोगी पडतील अश्या
वस्तू स्वत:हा त्यांच्या कार्येकत्यांसमवेत भेटून दिल्या आहेत.)

No comments:
Post a Comment