प्रत्येकाला आपलं करून आधार देणा-या ताईंच्या आत्म्यास
शांती मिळॊ!!!
माणसं आपली माणसं शोधतात पण प्रत्येकालाच आपलं मानून
जगण्यासाठी शिक्षण देवून आधार देणा-या निर्मलाताईनंच्या माणुसपणाला सलाम!
त्यांच्या आत्म्यास शांती मिळॊ!
कोणच पोहचत नाही त्या स्थळी
तिथे निर्मलाताईनी उभा केली वनस्थळी
निराधार माणसांचा जाऊ नये बळी
म्हणून माणुसकी जोपासणा-या विचारांची उभा केली फळी!
म्हणून जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी आम्हांला दिसतात
निर्मलाताई आणि त्यांची वनस्थळी!
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या परिसरात
माणुस घडवण्याची ताकत आहे. गेल्या ६० वर्षापासून तिथली मंडळी न थकता, न हरता,
शांत, संयमाने ग्रामिण भागातून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधार देतात.
त्याची सुरूवात डॉ. आच्युत आपटेनी केली. नंतर अनेक मान्यवर जोडले गेले. त्यात
निर्मलाताई पुरंदरे हे आघाडीवर होत्या. ताईनी विद्यार्थी साहाय्यक समितीतील
प्रत्येक विद्यार्थी आपला माणून त्याच्यावर माणूसपणाचे संस्कार केले त्यामुळेच आज
अनेक विद्यार्थी घडत आहेत. आणि त्यांच्या पायावर उभा राहात आहेत. ज्यावेळी ताई
समितीच्या प्रागंणात यायच्या त्यावेळी आम्हांला आईच जाणवायची त्यांच्या
व्यक्तीमत्वात. प्रेमाने, मायाचेच्या भाषेत समजावयाच्या अनेक गोष्टी. आजही मला तो
प्रसंग आठवतो की आम्ही, “ इंडिया इज माय कंट्री” ही एकांकीका बसवली होती. तो
प्रयोग पाहायला ताई आल्या होत्या. प्रयोग
झाल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेलो तर ताईंनी प्रश्न केला की “ही एकांकीका का
निवडली?” आम्ही बुचकुळ्यात पडलो. नंतर त्या म्हणाल्या “चांगला प्रयत्न आहे, पण जरा
सकारात्मक दिशा देणारं साहित्य निवडा. सातत्याने गरिबीची टिंगलं करणारे अनेक
कार्यक्रम बघत आसतो या देशात, पण कलात्मक जे विचारांना दिशा देईल असं काहीतरी सादर
करा. गरिबीमधीलं माणसांत ही माणुसपणाची श्रीमंती असते ते बघायला शिका म्हणजे अजून
चांगली नाटकं बसवता येतील.” त्यावेळी
कॉलेजच्या वयात काही जाणवलं नाही पण आज डायरी काढून बघितली तर ताईंचे विचार वाचून
मन सुन्न झालं. एवढी मोठी दूरदृष्टी त्यांच्या विचारात होती म्हणूनच ताईंनी
माहाराष्ट्रात ११ हजार पेक्षा जास्त बालवाडी प्रशिक्षीक महिला उभ्या केल्या. आज
हजारो बालक या अंगणवाडीतून शिकत आहेत. किंबहुना जिवनातील पहिला पाढा गिरवत आहेत. त्यामुळे ताईंच्या व्यक्तीमत्वाला अभिवादन!!!

No comments:
Post a Comment