Thursday, March 26, 2020

“मानवी नात्याची मळणी”












“असा सांगावा काय म्हणून धाडला असल वं? माज्या लेकरावर काई आळ तर आला नसेल ?”
“आगं, दिवस कसेल हायीत बागत न्हाईस का ! असल्या दिसांत तेवढच घारातल खाणार एक तोंड कमी करावं आसं वाटलं आसंल त्यांला”
“म्हंजी तीकडबी असलीच हालत आसलं का?”
“सामध्या दुनियेत असली हालत झालीया, तू वांजर खेड्याच काय घिऊन बसलीस!”
शेवंता काळजीच्या आवाजात म्हाणाली,
“ तसं आसल तर आणावा पुतळाला.”

हे संवाद चुंबळ या पहिल्या कथेतील आहेत.  आणि इथून या “मळणी” ची सुरवात होते.  मराठी साहित्या मध्ये मानवी भाव-भावनांच्या चेह-याच्या पलिकडे एक बुध्दीमान किंवा दुसरा साधरण माणूस जगण्यासाठी धडपड करत असतो. जर तो गावातील असेल तर मग अनेक पारंपारिक पध्दती त्याच्या जगण्यात येतात. त्याची असणारी नाती-गोती जी त्याला जगताना कधी मदत करतात तर कधी जगन नकोसं करून टाकतात. हे ओळखून लिखाण करणा-यां लेखंकापैकी अग्रण्य नाव म्हंणजे जेष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे. हे सांगण्याच कारण म्हणजे नुकतंच त्यांचा मळणी हा कथा संग्रह वाचला.
       या कथासंग्राहात एकूण १६ कथा आहेत. नवव्या क्रमांकावर असणारी मळणी कथा जे संग्राहाला शिर्षक आहे.  व्याक्तीच्या जन्माबरोबर त्याची नाती जन्म घेतात आणि त्याला इच्छा असो वा नसो त्याच्या वयाबरोबर ती वाढत जातात. हि नाती त्याला जोपासावी लागतात. नात्याच्या बंधनात त्याला गुरफटून बसावं लागत. काही वेळेला तर त्याला वैयक्तीक सुखाला पारख व्हावं लागत .  अशावेळी व्यक्ती म्हणून त्याला अस्तित्वच उरत नाही. दुसर्यासाठी जगण एवढच त्याच्या नशिबी येत आणि तोही निमुटपणे हे नशीब जगात असतो . काही वेळेला नात्याची ही बंधन त्याला आपल्याकडे खेचत असतात. अशावेळी त्याच्या मनाची अतिशय ओढाताण होत असते. शेवटी वैयक्तीक सुखाना त्याला दूर कराव लागतं . आपल्या इच्छाआकांक्षा आपल्या पायाखाली तुडवाव्या लागतात. या इच्छा आकांक्षाची त्याला मळणी करावी लागते. हेच आजही प्रत्येकाच्या आयुष्यात  घडत आहे .    
     या  संग्रहातील प्रत्येक कथा नात्यातील मर्म दाखवते. जे मर्म जगताना प्रत्येक जण अनुभवत असतो. वाचताना असं वाटत कि आपण तो प्रसंग जगतच आहोत. काही वेळेला अंगावर काटे उभा राहातात तर काही वेळेला रडायला येत. तर कुठ हसायलाही येत. काही  कथेतील पात्राबद्दल कीव वाटते तर काहीचा राग येतो. हे सर्व जणूकाही तुमच्या माझ्यातील आहे असचं वाटत राहत.
तर सध्याच्या या काळात आपणास गुंतवून ठेवून आधार देणारा एक उत्तम कथा सग्रह “मळणी”.

कथा संग्रह : मळणी
लेखक: रा.रं. बोराडे
प्रकाशन:  साकेत प्रकाशन, औरंगाबाद
टिपण
ज्ञानेश्वर जाधवर   

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts