सध्या आपण सर्वच
अस्वस्थ झालो आहोत. त्यात मजूरांचे तर भयानक हाल होत आहेत. मागच्या आठवड्यात सचिन सातारा
उपजिल्हा रुग्णालयांत पीपी किटचे वाटप करण्यासाठी गेला होता. कराड हून कोरेगावकडे जाताना
यशवंतनगर साखर कारखाना वाटेत लागला. कारखान्यासमोर असंख्य मजूर अस्वथ, बेचैन होऊन बसले
होते. वाटेकडॆ डोळे लावून बसले होते की कोणीतरी येईल आणि गावाकडे जाण्यासाठी मदत करेल.
पण मुकदम आणि इतर लोकांनी हात वर केले. त्यामुळे हे मजूर आरोडा-ओरड करत होते. मुकदाम
म्हणत होते की गाडी ठरवा आणि तुमचे तुम्ही जा. पण त्या ४० लोकांनकडे जाण्य़ासाठी पैसेच
नव्हते.
सचिनने जाऊन विचारपूस केली व
चर्चेनंतर असं लक्षात आलं की या लोकांची आपल्या मूळ गावी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये
जाण्यासाठी हालचाली सुरू आहे. परंतु त्यांच्याकडे
जाण्यासाठी वाहन नव्हते व पैसे नव्हते. मग श्री पुरूषोत्तम जाधव जे सातारा येथील एक उद्योजक
आहेत. मग त्यांच्या मदतीने त्या मजूरांना एकत्रित
रीत्या तीन टेम्पो करून दिले व थोडेफार जाण्या पुरते आर्थिक तजवीज केली. हे सर्व मजूर बीड जिल्ह्यातील आष्टी, केज, शिरूर कासार या भागातील होते. जाताना त्यातील एक म्हातारी
सचिनला म्हणाली, “बाबा, देव तुझं भलं करो..देवा सारखा धावून आलास..” असं म्हणून त्या
म्हातारीने पदराने डोळे पुसले. त्यांच सामान टॅम्पोत चढवले. आणि टॅम्पो बीडच्या दिशेने
निघाला. त्यावेळी त्यांच्या चेह-यावर असं दिसत होतं की मोठ्या संकटातून वाचलो आहोत.
इतर मजूरांच्या
तुलनेत ऊसतोड मजुरांचे हाल जास्त झाले असते पण शासनाच्या वेळीच निर्णयामुळे लाखो ऊस
तोड मजूर बस, टॅम्पो, ट्रक च्या माध्यमातून घरी पोहचले. ज्यांना जायचं नव्हतं त्यांची
व्यवस्था कारखान्यवर केली. आणि असे सचिनसारखे, पुरूषोत्तम जाधव सरांनसारखे अनेक दानशूर
पुढे आले त्यामुळे ह्या मजुरांच्या डोळ्यातील आश्रू पुसू शकले.


Great
ReplyDeleteGreat work 👍👍
ReplyDelete